दिप घेउन चाल गड्या
वस्तीत अंधार दाटलाय फार...
वाटतोय प्रत्येकच भयभीत ईथला..
चहुकडे माजलाय हाहाकार...
दिप घेऊन चाल गड्या..
गल्लोगल्ली अन् रानोमाळ...
फुलव अंगणोअंगणी प्रकाश...
तिमिराला नित्य जाळं...
दिप घेऊन चाल गड्या...
कर एकाच तरी आयुष्य उजळं...
जरी सुर्य नाही होता आलं...
तरी निदान पणती होऊन जळं...!
महेंद्र कांबळे.
(माझ्या "अर्घ्यदान"
या काव्यसंग्रहा मधून)