लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

तुझी आठवण येते.....!!!!

तुझी आठवण येते...
बघतो एखाद्या ग्रुपला दंगामस्ती करतांना
मिळुन मिसळुन धमाल करत ईकडुन तिकडे
फिरतांना..
मन उगाच गलबलते
अन् दोस्ता...
तुझी आठवण येते.
दिसतं भर पावसात कुणी
हात गुंफुन चालतांना डोळ्यात टाकुन डोळे
भान विसरुन बोलतांना
जरा काळीज चलबिचलते
अन् सये...
तुझी आठवण येते...
बघतो कुणालातरी चिमणचोचीने
चारा भरवतांना...
आणि आपल्या पिल्लांवर...
मायेच आभाळ पसरवतांना...
उगच पापणी पाणावते
अन् माये...
तुझी आठवण येते...
------------
एकट्याचाच असतो आरंभ
प्रवासभरही माणूस एकटाच..
एकट्यानचं
की असत जाणं.
गर्दित मिही आतून एकटाच....
आपलं कुणी जवळ असाव रावं...
सारखं सारखं
वाटत राहते..
अन् मज "तुझी" आठवण
येते....!!!!
महेंद्र कांबळे.
दि.13/04/12
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected