लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

उतारा......

उतारा...
लहाणपणी जेव्हा....
पिवळंधम्मक तोंड करत
बनियानीवर रस सांडवत
तडस लागेपर्यंत आंबे खायचो....

तेव्हा माय (आजी)
मायेनं हातावर चारसहा
जांभळं ठेवत म्हणायची...
'आंबे पचत्यात जांभळानं
हा आंब्यावर रामबाण उतारा हाय'..,
आता......
रात्री ब-याच उशीरवर
मित्रांसोबत 'बसल्यावर'
जेव्हा सकाळी डोकं जडावतं
अन् जिभंही कशिशीच सपकते....
तेव्हा एखादा जिगरदोस्त
हातावर 'टिन' ठेवत म्हणतो...
घे माझ्याजवळ 'उतारा' आहे...
महेंद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected