लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

परत एकदा.

अजुन का स्मरतो मजला
तो तूझा उन उन श्वास
अजुन का दारास दुपारी
सतत चांदण्यांचे आभास.

अजुन पुरता मेलो नाही
थोडा बहूत जीवंत आहे
अजुन मनाच्या कोपर्यात त्या
थोडा थोडा वसंत आहे.

वठलेले जरी झाड जाहलो
परत नव्याने होईन हिरवा
उरातली विसरून भैरवी
परत आता छेडीन मारवा.

परत एकदा लिहिन कविता
डोळ्यामधले पुसून पाणि
हरफ हरफ जुळवीन नव्याने
तुझ्यावरतीच लिहिन गाणी......

महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected