लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

उठाव..

जो तो इथे विचारे बाजारभाव माझा
मी ठेवला म्हणूनी कोराच ताव माझा.

कळलीच ना कधीही कविता कुणास माझी
त्यांना म्हणे कळाला आता उठाव माझा.

पोटात भूक नाचे भांडू कसा जगाशी
लागेल का उपाशी येथे निभाव माझा.

गेली जरी निघोनी श्वासात नांदते ती
जगण्यात का तिच्याही आहे अभाव माझा.

मागीतली कधीही मी भीक ना कुणाला
तो-यात चालण्याचा आहे स्वभाव माझा.

महेन्द्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected