लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

बावरी...


तिला चांदण्यातही पोळतांना
धरावी उन्हाने कशी सावली?
कुरवाळतांना तिचे दुःख गहिरे
अंधार होई जणू माऊली

सांभाळते ती उरी लक्तरांना
तरी श्वास छातीत का गुदमरे?
ओठावरी हास्य बहरुन येता
नयनात का अमृतांचे झरे?

शोषूण घेते तिची वेदना ती
आणिक दिसते सदा कोरडी
जरा सावजाने निसटून जाता
घायाळ होई तिचा पारधी..

असह्यशी वेदना सोसताना
असे शांत का ती समुद्रापरी
अस्वस्थ होतो तिला पाहतांना
भासे मला ती मीरा बावरी...

महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected