लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

जिव जायचा थांबला....

कशी तुटली दारात
सांग मोतियांची माळ
तिथे अबोल नजरा
ईथे पेटलेला जाळ

किती सांज चिनभिनं
गेल्या उसासुन राती
ओल्या जखमाच साऱ्या
पुन्हा रक्ताळून येती

नेल्या पुसून लाटांनी
ओल्या पावलांच्या खुणा
असे भरती ओहोटी
समजावे कसे कुणा?

तेंव्हा बोलली तू होती
चल घर एक बांधू
आता फाटलेल जीणं
सांग कुठं कुठं सांधू?

पोतराजाचा चाबूक
सारा खुशीचा मामला
डोकावून नको बघू
जिव जायचा थांबला...

महेंद्र गौतम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected