लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

जराशी सांज ढळतांना...

जराशी सांज ढळतांना...

जराशी सांज ढळतांना
तुझा आभास दरवळतो
कुणी पाण्यात ही जळतो
कुणाला मोगरा छळतो...

अशी निसटून जातांना
पुसटसा गंध ठेवून जा
तिथे चांदणे बहरतांना
ईथे अंधार तळमळतो...

तिच्या स्वप्निल डोळ्यातून
आसवांनो नका येवू
कशी सय दाटूनी येते
आणि प्राजक्त ओघळतो...

महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected