भरवसा टाकला होता तुझ्यावर
वाहतो रोज माझे मी कलेवर
कुठुन हा पूर भेटायास आला
कुणाच्या आतले फुटले सरोवर
तगून राहू कठीण दिवसांत या
उरीभेटू लढाई संपल्यावर
मोर्चे निषेध बाकी शुन्य सारे
सांग उरते काय जिव घेतल्यावर
जिवघेणे खेळ सत्तेचे सतत
शोषणाचा खेळ चाले निरंतर
कंठ आहे तुला मग का भितो तू?
मार वेड्या थाप आता डफावर..
महेंद्र गौतम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा