लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

डायरीचं पानं...

हो मला दुःख होतं. वेदना होतात.
कुणी अपमान केला तर
कानशीलही तापतात. कौतुक
वाट्याला आल्यावर मी हुरळून जातो.
आनंद झाल्यावर हसतो अन् रडतो देखील.
उदासीनता, अस्वस्थता, नैराश्य ते तर
येतचं. किंबहुना ते यावचं.
एखादा सुंदर चेहरा समोरुन जाताच
बघण्याचा मोह होतो. फुलांचा गंध,
पहिल्या सरिचा मृद्गंध मला बेभान करतो.
ह्या गोष्टींमुळे मला जिवंत
असल्याचा भरवसा येतो.
साधा माणुस आहे मी षडरिपूनी युक्त असा.
कुणी योगी नाही स्थितप्रज्ञ तर मुळीच
नाही....
पण एखाद्या फुलाचा उरभर सुगंध घेतांना ते
चुरगाळू नये याच भानं मी कायम ठेवतोचं.
महेंद्र कांबळे. .

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected