लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

डायरीचं पान 4

दरवेळेस आयुष्याचा नवा डाव मांडण
खरोखरच कठीण असत. परत
नव्या सोंगट्या घेऊन पट मांडायला आयुष्य
म्हणजे बुध्दीबळाचा खेळ नव्हे.
काही काही नाती खरोखरच गुढ. एखाद
माणुस आयुष्यात येणं अन् फेर धरुन आयुष्यच
त्याभोवती नाचु लागनं सगळचं
अनाकलनिय.
ठसठसणार्या जखमा घेऊन
नव्या नात्याची सुरवात कशी करावी?
जुन्या नात्याचं अपयश भिववतं.
तू आयुष्यात येण्याअगोदर खरतर जगणं
म्हणजे आवसेची किर्र रात्रचं होऊन गेलेलं.
तशात तुझं चांदणं आयुष्यात पडलं अन्
जिवनाच्या दिशा उजळुन गेल्या...
त्यातही मी असा, कायम
फाटका खिसा त्याहुन फाटकं तोंड.....
पाऊलो कोएलोनं ब्रिडात
प्राणसखिचा कन्सेप्ट
सांगितला तसा मला काय
पहील्यांदा पाहताच
तुझ्या डाव्या खांद्यावर प्रकाशबिंदु
दिसला नाही. पण डोळे भिडल्यावर एक
विशीष्ट चमक डोळ्यात जाणवली तुझ्या...
आता त्या गोष्टींचा उगाच अर्थ लावत
बसतोय एकट्यात.
खरतर आजवरची वाटचाल निर्धेयचं. रखरख
वाळवंटाचाच रस्ता पाचविला पुजलेला...
अश्यात पहिलं मरुद्यान लागल कवितेचं
नी गाण्याचं, नंतर मित्रांच नी तुझं...
माझं एक बरयं लिहुन चार
मित्रांना निदान सांगु तरी शकतो..
तुला मात्र आसवं गाळण्यावाचुन पर्याय
नाही. एकुण सारखचं, मला लिहून हलकं
वाटतं अन् तुला रडुन.
संदिप खरेंनी काय सुंदर लिहलय ना..
झरते तिकडे पाणि टपटप
अन् ईकडे ही शाई झरझर..
कितीक हळवे कितीक सुंदर...
किती शहाणे आपुले अंतर.
महेंद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected