लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

पेटून उठावे आता...

पेटून उठावे आता...
डोस्क हाय का जाग्यावर?
का धुसफुसाया लागलास?
कालेजात शिकलास, गाँटमॅट बोलायलास..
म्हुन जास्त शाना झालास?
काय करु आबा....
ग्रामसेवकान दोनशे खाल्ले
त्याला धरुन नेला.
अन् करोडो जिरवलेला,
जामीनावर सुटला..
त्याचा म्हणे सत्कार केला..
आरं पारं पिकलो,
मरायला टेकलो...!!
पळापळीच्या साली पाच रोहीले धरले...
गंगच्या थडंला नेऊन कापले.....
भारत माता की जय
आबादी आबाद झालं,
सवतंत्र मिळाल म्हणाले
चौथी यत्ता शिकलो..
मास्तर न व्हता काळ्या माय कडं वळलो..
कसण्यात रग जिरवली
अन् ईथच चुकलो...
आबा...
कापसाच्या गाड्या ओढण्यात...
फुकट आयुष्य घालवलत..
पण मला वाटत...
वणवा होऊन जाळत सुटावं आता...
वाझोंटी व्यवस्थाच बदलण्या...
नेटान झटावं आता...
बारुद पेरलय गात्रागात्रात...
पेटून उठावं आता...!!!!
महेंद्र कांबळे.
दि.02/07/12
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected