वर्षभरात एखादतरी मोठ आजारपण माणसाला यायलाच हवं complete bed rest.. एरवी
तसही कधी स्वस्थपणे बसून स्वतःचा विचार मला नाही वाटत कुणी करत असेल.
ईतक्या गोष्टी उलगडतात अन् ईतके गुंते सुटतात अश्यावेळी की थक्कच व्हायला होतं..
आज टि.व्ही वर ता-याच बेट नावाचा नितांत सुंदर सिनेमा पाहीला तसा तो चारेक वेळेस तरी मी पाहीलाय दरवेळी काहीतरी नवं देऊन जातो तो मला. काही काही कलाकृती अजोडचं मग ती धग, पुर्णामायची लेकरं ऑलकेमीस्ट, मृत्युजंय सारखी कादबंरी असो, सलाम,बोलगाणी किंवा सुर्व्यांचा किंवा अजुन कुणाचा काव्यसंग्रह असो, दादांची किंवा जगजितची एखादी गझल असो वा पु.ल. व.पूं.च पुस्तकं यांच्यातुन मिळणारा आनंद कधी शिळा होतच नाही.
ता-यांच बेट, एक निरागस मुलगा आणि त्याचा जेमतेम परिस्थिती असणारा बाप साधा सरळमार्गी कमालीचा श्रध्दाळू ईसम.
पोराची एक ईच्छा फाईव्ह स्टार मध्ये मज्जा करण्याची त्यासाठी अभ्यास करुन तो वर्गात पहिला देखील येतो..
पोराची ईच्छा पुर्ण करण्यासाठी धडपडणारा बाप सरळ मार्गाने पैसा जुळवण्यात अपयशी ठरतो अन् मग चिडुन सगळे संस्कार डब्बाबंद करुन वाममार्गाने पैसा कमवायला लागतो पण शेवटी पश्चातापदग्ध होतो..
अन् मुळ आयुष्यच जगायला लागतो..
कथानक भारी भन्नाट..
माणुस कितिही वाईट असला तरी त्याच्यातलं चांगुलपण कधी मरतच नाही. आणि सखोल आत असणारा तो सल एकदम वर येतो त्यालाच बहुधा पश्चाताप म्हणत असावेत..
तुमचा मुळ स्वभावं,जडणघडण कधीच बदलत नाही हेच खरय कि काय कुणास ठाउकं....
ईतक्या गोष्टी उलगडतात अन् ईतके गुंते सुटतात अश्यावेळी की थक्कच व्हायला होतं..
आज टि.व्ही वर ता-याच बेट नावाचा नितांत सुंदर सिनेमा पाहीला तसा तो चारेक वेळेस तरी मी पाहीलाय दरवेळी काहीतरी नवं देऊन जातो तो मला. काही काही कलाकृती अजोडचं मग ती धग, पुर्णामायची लेकरं ऑलकेमीस्ट, मृत्युजंय सारखी कादबंरी असो, सलाम,बोलगाणी किंवा सुर्व्यांचा किंवा अजुन कुणाचा काव्यसंग्रह असो, दादांची किंवा जगजितची एखादी गझल असो वा पु.ल. व.पूं.च पुस्तकं यांच्यातुन मिळणारा आनंद कधी शिळा होतच नाही.
ता-यांच बेट, एक निरागस मुलगा आणि त्याचा जेमतेम परिस्थिती असणारा बाप साधा सरळमार्गी कमालीचा श्रध्दाळू ईसम.
पोराची एक ईच्छा फाईव्ह स्टार मध्ये मज्जा करण्याची त्यासाठी अभ्यास करुन तो वर्गात पहिला देखील येतो..
पोराची ईच्छा पुर्ण करण्यासाठी धडपडणारा बाप सरळ मार्गाने पैसा जुळवण्यात अपयशी ठरतो अन् मग चिडुन सगळे संस्कार डब्बाबंद करुन वाममार्गाने पैसा कमवायला लागतो पण शेवटी पश्चातापदग्ध होतो..
अन् मुळ आयुष्यच जगायला लागतो..
कथानक भारी भन्नाट..
माणुस कितिही वाईट असला तरी त्याच्यातलं चांगुलपण कधी मरतच नाही. आणि सखोल आत असणारा तो सल एकदम वर येतो त्यालाच बहुधा पश्चाताप म्हणत असावेत..
तुमचा मुळ स्वभावं,जडणघडण कधीच बदलत नाही हेच खरय कि काय कुणास ठाउकं....