लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

हुरहुर....

संध्याकाळच्या मंद प्रकाशात
मी एकटाच...
दिवसभराच्या कामाची
गोळाबेरीज करण्यात मश्गुल
खिडकीबाहेरच्या निंबाची पाने...
हलतात हलके हलके
नुकताच सुर्याच्या सोनेरी किरणांना
त्यांनी निरोप दिलेला....
खिडकीबाहेर टाकतो
सहज एक कटाक्ष
काहीतरी हलतं माझ्याही मनाच्या
खोल खोल डोहातं...
कश्याच्या तरी जाणीवेनं..
बघतो परत मंदस्मित करणा-या
मोहक संध्येकडं,
हातातले कागद गुंडाळून ठेवतं
मी हसतो गालातं..
थंडगार झुळूक चेह-यावर
घेत....
मनाशीच म्हणतो...
'काल जाम भांडली होतीस
फोनवरं.....
आता काय करत असशीलं?'
महेंद्र कांबळे
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected