लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

फुपाटा....

आपल्याबी आयुक्षात
अस कायतरी घडावं
मलेबी वाटते राजेहो
का मी पिरमात पडावं...
कालेजातल्या जवा मी
पोरी पायतो
सर्ग फक्त मले
दोनच बोट रायतो...
पायतो पोरापोरीयला
गुलूगुलू बोलताना
मनात सारखा सुरु रायतो
ताना धिन तंदाना...
म्हनं हे पोर पोरी
संग आईसकीरीम खात्यात
एकमेकाईसंग म्हनं
सिनेमाला बि जात्यात..
एक पोरगी मले
लय लय आवडते
पण दिसली ती का माई
चड्डीच गयते....
--------------------
कालेजातुन जवा
घरी मी येतो
झोपड्याला पाहून मनात
पयला ईचार येतो
पावसाळ्यात गळक्या झोपड्यात
कसं झोपावं?
दोन वर्सापास्न भईन घरीच हाय
तिच्या लग्नाच काय करावं?
थकलेल्या मायचा जवा
चेहरा पायतो..
पिरमाचा ईचार
मनातुनच पयतो...
मले रोज दिसते
करजान बेजार झालेला बाप
अन् भाकरिची वाट पायनारी दिवडी..
संसारगाडा वडायची त्याला चिंता केवडी..?
आठ एकर कोरडवाहू
वायता वायता..
जाईन माई बी जिनगानी सडून
शेतक-याईच्या पोराईन
काय करावं पिरमात पडून?
काय करावं पिरमात पडून?
(अर्घ्यदानं)
महेंद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected