लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

समरांगणाच एक टोक पकडुनं.....

खरं तरं लढाईला तेव्हाचं
तोंड फुटलं होतं...
तुझ्याच काय पण
तुझ्या बापजाद्यांच्याही
जन्माअगोदर.....
किती युग लोटलीत
अन् या लढ्यानेही
किती रुपं घेतलीतं....
त्यात तुझी बाजू अगदीच लगंडी....
काळ्यांची ,शोषितांची,
...
कष्टकरी कामगारांची.....
'तुझं पध्दतशीरपणे खच्चीकरण करतील'..
निरागस मुखवट्याआडून
जिवघेणे वारही होतीलं...
डळमळु नकोस...
कारण प्रत्येक युगात
एक कडवा लढवय्या जन्मतोचं...
म्हणुन समरांगणाच एक टोक पकडुनं...
झुंजत रहा निरंतर...
हिरव्याची पिवळी पानेही होतीलं...
लवकरच संपुर्ण समानतेचे
दिवसंही येतीलं...
महेंद्र कांबळे.
दि.28.11.12
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected