लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

मी.


जगाने टाळलेला मी
तमाने जाळलेला मी.

कशाचा चांदवा आता
रूपाने पोळलेला मी.

वसंता दूर तू जा रे
मुळाशी वाळलेला मी.

कुणाची वाट ती पाही
तिनेही गाळलेला मी.

सईची याद ती येता
उभा गंधाळलेला मी.

कुणाला शोधतो आहे
कुणी धुंडाळलेला मी.

धावण्या वेग तो येता
जरा रेंगाळलेला मी.

जळूनी खाक झालो रे
अता तेजाळेला मी.
महेंद्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected