लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

सये असं छळू नये…!


सये असं छळू नये
सये असं जाळू नये
माझं काळीज पेटलं
कसं तुला कळू नये?

तुला छळायाची घाई
मला जळायाची घाई
नदीलाही सागराला
कशी मिळायची घाई
उभा सागरात तरी
प्याया पाणी मिळू नये
माझं काळीज पेटलं
कसं तुला कळू नये?

सये जाता जाता असं
नको फिरून गं बघू
कसं मनाला या सांगू
वेड्या राती नको जागू
असं पुढ गेल्यावर
पुन्हा मागे वळू नये
माझं काळीज पेटलं
कसं तुला कळू नये?

तुझ्या आठवाचा गंध
जसा प्राजक्त सांडला
काल म्हणे तुझ्यासवे
माझा मोगरा भांडला
तुही सय एकट्यात
माझी कुरवाळू नये.
माझं काळीज पेटलं
कसं तुला कळू नये?
महेंद्र गौतम.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected