लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

सैरभैर…

किरमिजी सांज अस्तमान सूर्य
आणि अंगावर येणारी कातरवेळ
अधिरलेले श्वास पावलांचे भास
पापणीत थांबलेले थेंब.
मोकळ्या हवेसाठी ग्यालरीत याव
तर रस्त्यात हात गुंफून
बेहोष चालणारे दोन जीव…
मग हृदयाच्या फडताळाच्या तळाशी
दाबून ठेवलेली वेदना
एकाएकि उफाळून येते वर
आणि आठवतात…….
त्या फुल्यांच्या रात्री ते अत्तरांचे दिवस
ते घरावरले मेघ तो दारावरचा पाऊस
मग क्षण खिन्न होऊन ओथंबतात
परसातला मोगराही होतो मलूल
निघतांना किमान "येते"……
एव्हढतरी म्हणायचं होतस ग…!!!!
महेंद्र गौतम…
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected