लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

अस पाणी यावं...

अस पाणी यावं...

अस पाणी यावं
येवो पुरावर पूर
ओठांची ही तृष्णा
जावो लाखो कोस दूर

नाचाविही विज
अश्या तूफान वेगानं
धरेला मिठीत
घ्यावं बेभान नभानं

भिजावं हे अंग
अंतरंगही भिजावं
झाकोळ आभाळ
पुन्हा स्वच्छ स्वच्छ व्हावं

अस पाणी यावं
सारं अंतर मिटाव
साऱ्या "माणसांनी"
एका जीवानं नांदावं....

महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected