2012 मध्ये माझा पहिला संग्रह प्रकाशीत झाला होता 'अर्घ्यदान'. मला वाटल संग्रह चार जाणत्या लोकांना दाखवून अभिप्राय घ्यावा, त्यांच मार्गदर्शन घ्याव जेणेकरून उणीवा समजतील, लिखाणाची दिशा स्पष्ट होईल. आपल काही चुकतमाकत असल्यास तेही समजेल. म्हणून कित्येकांना स्वखर्चाने पुस्तक पाठवल, मसापमधल्या लोकांचे नंबर मिळवले. पहिला कॉल केला....
"हैलो सर मी महेंद्र बोलतोय.
बोला.
सर मला जरा तुम्हाला भेटायला यायच होत.
कश्यासंदर्भात???
नुकताच माझा काव्य संग्रह प्रकाशीत झालाय थोडस मार्गदर्शन हव होत.......
नाहीहो हातावर काम पडलीत वेळच नाही सध्या..
बर तुम्हाला जेंव्हा वेळ असेल तेंव्हा येतो तुम्ही फ्री झालेकी.....
नाही हो एवढ्यात काही जमणारच नाही...
बर जेंव्हा जमेल तेंव्हा........
ते मी कस सांगू???? ठेवतो.....
फोन कट.
परत दुसऱ्या कोणाला फोन करण्याची हिम्मत नाही झाली एवढा जबरदस्त हिरमोड झाला..
"अनावर"च्या प्रकाशनाच्यावेळी "दासु" बोलत होते संग्रह वाचताना मला प्रश्न पडला की महेंद्र गौतम हे नाव मी यापूर्वी ऐकल कस नाही? या कविचा एक संग्रह येऊन गेला तरी आपण त्याच पुस्तक वाचल कस नाही.. मला ओरडून सांगावस वाटल सर तुमच्यापर्यन्त येण्याच धाडसच झाल नाही.....
दूसरी बाजू अशी की काहिच्या काही लिहून त्याच कौतुक व्हाव असा अट्टहास करणारे लोक सुद्धा बरेच येऊन गेलेत आयुष्यात किंबहुना कितीतरी जणांची पुस्तक न वाचता मी स्वतः अडगळीत फेकलीत एव्हढ डोक्यात जात काही जणांच लिहीन... मग अश्यावेळी प्रस्थापित नवोदितांना डावलतात अश्या बोंबा का मारायच्या उगाच???
सांगायचा मुद्दा एव्हढाच की मसापची रणधुमाळी सुरु आहे बदल करू, परिवर्तन करू अश्या हाकाट्या ऐकू येताहेत.. काही भेंडी बदल घडणार नाही.. एक कळप जाऊन दूसरा कळप येईल एव्हढाच काय तो झाला तर बदल होईल.. मग तेच थोर कवी तेच थोर लेखक त्याच महान लोकांनी मायमराठी वाचवण्याचा घेतलेला वसा प्रत्येक पत्रिकेवर त्याच कळपशील लोकांची नाव... तेच नवोदितांना अन्नुलेखान मारण... तेच तेच सगळ....
तरिपण मी मतदान करणार आहे दोन्ही गटात काही चांगली माणस नक्कीच आहेत मी गट न पाहता त्या माणसांना मत देणार आहे...
आणि सगळ्या प्रस्थापितांना फाट्यावर मारून आपल गुपचुप जे सुचेल ते भलबूर लिहित बसणार आहे....
महेंद्र गौतम.