लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

पाऊस जरा येता

पाऊस जरा येता छळतो तुझा अबोला
कोठे ढगास वेड्या कळतो तुझा अबोला

हा राग आग मिरची अन नाक लाल शेंडा
मी काय करू ज्याने पळतो तुझा अबोला??

हो तूच खरी बाई मान्यं जेंव्हा करतो
तेंव्हाच गड्या कोठे टळतो तुझा अबोला

पाहून कुणासंगे कोणास चालतांना
माझ्या मनात तेंव्हा जळतो तुझा अबोला....

सय दाटते तुझी अन रात्रं वैरी होते
डोळ्यांमधून माझ्या गळतो तुझा अबोला..

महेंद्र गौतम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected