लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

गझल

ओळ ओळ भांडत गेलो
तुला कवितेतुन मांडत गेलो
तू दिलेस अनावर अश्रु डोळ्यांना
मी होऊन गझल सांडत गेलो....
----++-----------+++-----------------------++-------------------------
किती त्रास होतो फुले माळतांना
नवा घाव देशी जुने बोलतांना

कशी ये फुलूनी शरीरात जाई
असे काय होते तुला पाहतांना

अवेळीच येतो नभी चांद वेडा
जरा काळजी घे सये चालतांना

किती रेशमी पाश हे पाकळ्यांचे
कसे सोडवावे मिठी सोडतांना

नको अंत पाहू अता गे असा तू
अरे जिव जातो व्यथा साहतांना.......

महेंद्र गौतम...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected