सांगू नकोस मित्रा तू बात पावसाची
दांभिक फार असते ही जात पावसाची
बडवून ऊर रडते येथे सदाच छप्पर
जागून काढते घर दर रात पावसाची
चिंता कुणी पिलांची करती वर पाहून
कोणी अघोर गाणी गातात पावसाची
गंधाळल्या मिठयांच्या मी वाहिल्यात होड्या
स्वप्ने पुरात वाहून जातात पावसाची
बसले कसे पिसारे फुलवून 'मोर' सारे
झाली कुठे आताशा सुरवात पावसाची....
महेंद्र गौतम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा