लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

डोह गढूळला कोणी?


चंद्र उगवला पूर्ण
डोह गढूळला कोणी
टीप गाळीत बसल्या
नदीपात्रात हत्तीणी..

उन्ह पाऊस झेलून
उभा मठातला चाफा
त्याच्या बुडाशी बसून
कोण गातं प्रेमगाणी..

नको नजर देऊस
ऐक घरंदाज पोरी
पुढे डोंगर दिसता
होतं काळजाचं पाणी..

तश्या शुभ्र एकांतात
मोह मिठीचा आवर
वाट विंचवाची नांगी
तुझे पाय अनवाणी..

महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected