लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

डायरीचं पानं..

ध्यानाचा आनंद अद्भुत असतो. स्वतःत डोळे मिटुन हरवुन जाण्यात केव्हढं सौख्य.
अंधार गुडूप मनाची नदी अन् मनाच्याच डोँगीत विहरणारे आपण....
मनाला निर्वीचारी करणं हा परमोच्च बिंदु पण तस करतांना आता कुठलाचं विचार करायचा नाही हा विचार डोकावतोचं.. भारीच मज्जा....!
कित्येकदा ठरवुनही ध्यानाला बसणं नाही होत पण बसल की इतके दिवस काहीतरी मिस केल्याची चुटपुट लागतेचं..
... काकांसोबत पहाटच्या पाचाला फिरायला गेलो, तेव्हढ्या सकाळी चहाची एक टपरी उघडलेली..
काय सुंदर सकाळ आहे ना काका? मी बोलुन गेलो...
सकाळ रोजचं होते अन् ती नेहमी सुंदरच असते..
अर्धशिक्षित चहावाल्यानं किती सहजपणे एक सखोल गोष्ट सांगीतली..!
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected