लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

प्रेमाची भानगड .......स्वभाव..

नातं
कुठलही असो तुटतांनाच्या वेदना ठरलेल्याच
त्यातही जर प्रेमाची भानगड असेल तर,
काळजावरले ओरखडे असह्यचं...
मुळात शरीरावरल्या जखमा दिसतात
मलमपट्टी पण करता येते पण
मनाच्या जखमांच काय?
मनालाही जखमा होतात
त्यालाही ईलाजाची आवश्यकता असते हेच
कित्येकांना ठाऊक नसतं...
तो अन ती....
तो म्हणतो प्रवासात
अनोळखी लोकांशी उगच बोलु नये
(विशेषतः समवयस्क तरुणांशी)
ती म्हणते नाही मी कशाला बोलत बसेन
उगाचं...
काही दिवसानंतर तिचा काँल वेटिंगवर....
कुणाशी बोलत होतीस..?
अमक्याशी...
तुझ्या ओळखीचा आहे?
हो दोन महिन्या अगोदर प्रवासात ओळख
झाली माझ्याच डब्ब्यात होता..
आणि मला आता सांगतेस?
लक्षात नाही राहिलं...
अश्यावेळी त्याची काय अवस्था होत
असेल?
आता दुसरी गोष्ट..
तो म्हणतो तु कुणाच्या गाडीवर
बसल्याची कल्पना पण नाही करवत यार.
पार जळुनच जाईल अस काही मला दिसलं
तर.
ति म्हणते वेडा आहेस का? कायपण विचार
का करतो मी कशाला जाईन
दुस-याच्या गाडिवर...
काही दिवसानंतर
अरे मला बाहेर जायचय जरा पहाटे
पाचाला निघावं लागेल
ढमक्याला गाडीवर सोड म्हणु का?
बिचारा पार
बिथरतो म्हणतो मैत्रिंनी मेल्यात काय
तुझ्या मुलं कशाला हवित तुला सोडायला..
सांगुन सुध्दा असच का वागतेस.. प्रकरण
वाढतं..
पुष्कळ वेळा असच काय काय घडत राहत अन्
गाडी येते ब्रेकअप च्या फलाटावर.. चुक
त्याचीही असतेच अद्वातद्वा बोलतो तो..
तिही कुठे ना चुकतेचं..
पण स्त्रित्वाचा असा कुठला पैलु आहे
जो त्याला आजन्म कळत नाही?
आणि पुरुषाच कुठलं लक्षण आहे जे
तिला कधी उमजतच नाही..?
आहे काही उत्तर.. असल्यास द्या रावं
खरचं..
महेंद्र कांबळे..
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected