लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

माझ्या त्या सा-या कविता .........

माझ्या त्या सा-या कविता
ज्यात कधी चंद्र असायचा
कधी सुर्य दिसायचा
कधी मोगराही गंधवेड हसायचा.
माझ्या त्या सा-या कविता
ज्यात सकारात्मकतेचा सूर होता
धपापता उर होता
गढुळपिवळा पूर होता.
माझ्या त्या सा-या कविता
काही प्रेमबंबाळ होत्या
काही अवखळ खट्याळ होत्या
काळीजविरहाचा जाळ होत्या.
माझ्या त्या सा-या कविता
ज्यात काव्य अगदिच कमी
पण भावना मात्र अस्सल होती
शब्दाशब्दांमध्ये कसलितरी टस्सल होती.
माझ्या त्या सा-या कविता
कुठली काँलेजमध्ये झळकलेली
एखादी दैनिकात आलेली
एकतर खास 'तिला'
'ईम्प्रेस' करायला लिहिलेली.
माझ्या त्या सा-या कविता
ज्या गझलेवर जळत नव्हत्या
वृत्तबध्द नाहीत म्हणुन सलत नव्हत्या
लोकभितीन काजळत नव्हत्या...
----------------
कधी फार गुदमरायला झाल्यावर
जुन्या वहितून त्यांची भेट घेतो...
अन् त्यांच्याहून नजर फिरवत
एकटाच खुळ्यागत हसत राहतो...
महेंद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected