लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

गझल.

तुझे गोड कावे तुझे फोल दावे
अता जाणले मी तुझे बारकावे.

कशाला जगाची तमा बाळगावी
कशाला जगाशी अता मी लढावे.

मला साथ आहे इथे वादळांची
खुळ्या संकटांनी जरा दूर व्हावे.

उन्मळून गेलो तिने दूर जाता
तिच्या आठवांनी कशालाच यावे.?

नको घेउ हाती जगाचा तराजू
जरा काळजीने मला तू बघावे.

असा संपलो मी असे वाटतांना
तुझ्या वेदनांनी फुलारून यावे.

किती तू गहिरा दिला घाव होता
किती सावरावे कसे सावरावे.?

(अकस्मात जेंव्हा समोरून आली)
कळेना मला मी कसे आवरावे.

नवा आरसा कि नवा चेहरा हा
नव्याने कसे मी हसूनी जगावे.

नशिबात आहे अशी हि फकीरी
सुखाचे मला तू अता दान दयावे.
महेंद्र गौतम.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected