लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

निनादते घंटा

निनादते घंटा
रोज तुझ्या दारी
भार असा शिरी
टाकीला का?
चढविले रोज
पायी तुझ्या फूल
तूच अशी हूल
का रे दिली?
ऊर जड माझा
श्वास जड माझे
पाठिवर ओझे
वाहू कैसे?
नाद ताल गेला
सांगू कसे तुला
सुर हरवला
जिवनाचा
दुभंगली भुई
कोणी वाली नाही
डोळा पाणी वाही
सारखेच
रोजच पडते
दुखाःत या भर
अंत आता कर
वेदनेचा.
महेंद्र गौतम.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected