लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

पावसाकड पाहुन.....

मस्त रिमझीम सुरू होती. थंडगार रोमँटिक हवा, अश्यावेळी चहा भज्यांचा माहोल तो बनता ही है.. आम्ही कँटिनमध्ये घुसलो.
'अज्जु तिनं भजे.... गरम'
तो खिन्नशी मान हलवत पाय ओढतं कढाईकडे हातात तिन प्लेट घेऊन निघाला. मी मनात म्हटलं काहितरी बिनसलय याच आज नेहमीसारखा प्रसन्न नाही दिसतं.. भजे संपता संपता मी परत ओरडलो 'अज्जु तिन काँफी तुझ्याहातची स्पेशलं' त्याचा चेहरा मलुलचं..
एवढ्यात काऊंटरवाला मामा त्याच्याजवळ गेला.
अज्जु एव्हढी काँफी बनव आणि तू दोन एक घंट्यासाठी घरी जाऊन आराम करं. कोप-यात छत्री आहे भिजत नको जाऊ. त्याचा चेहरा फुलला पटकन वाफाळती काँफि माझ्यासमोर ठेवली तेव्हा डोळ्यात भारी चमक होती त्याच्या. तो आनंदाने उड्या मारत निघून गेला. कौंटरवाला मामा हळूच माझ्या जवळ येत म्हणाला 'कसय नवनवच लगन झालै त्याचं, पावसाकड पाहुन उगीच चुकचुक करित व्हता म्हणून दिलं पाठवुनं.. एक डोळा मारत मामा पुढ म्हणाला..
'आरं आम्हिय कव्हातरी नवेतरणे व्हतोच की'.
आम्हि तिघं हसलो..
आजची काँफी मात्र नेहमीपेक्षा जरा जास्तच कडक होती..
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected