लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

ती अल्लड कधी.......

ती अल्लड कधी.....

ती अल्लड कधी अलवार कधी
ती विज कधी तलवार कधी
ती वादळ झंझावात कधी
अन झुळूक ती हळूवार कधी....

ती ठरवते ते होते
आभाळही खाली येते
किती सहज ती कोणाही
आपुलेसे करून घेते
रागातही तिच्या अनोखी
एक छटा प्रेममय असते
ती पत्थर होतानाही
काळीज फुलांचे जपते
ती हट्ट कधी लडिवाळ कधी
ती अल्लड कधी अलवार कधी
ती विज कधी तलवार कधी....

महेंद्र गौतम...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected