लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

माझी माणस.

पहिल्यांदा जेंव्हा त्याला भेटलो तेंव्हा लक्षात राहिले त्याचे स्निग्ध स्नेहाळ डोळे आणि बोलण्यातल मार्दव. तो बिग बी अमोल सारखा डॅशिंग नव्हता की विक्की भाई सारखा हरहुन्नरी कलाकार नव्हता पण होता एकदम कूल. मी फर्स्टला होतो तेंव्हा हा फाइनलला होता, मुळात आमचे सगळे सिनिअर्स खतरनाक होते, रॅगींग नव्हतं पण इंट्रो एव्हढा कडक होता की सांगता सोय नाही. पण तेच सिनीअर्स जातांना स्वतःच्या नोट्स कॅल्सी ड्राफ्टर ड्राइंग बोर्ड देऊन जात, अडचणीला धाउन येत. काही काही हलकट होते ते असो पण सिनीअर म्हटलं की टरकायची, "खाली मुंडी तीसरी गुंडीची" भीति वाटायची. स्कॉलरशिपचा मला काहीतरी प्रॉब्लम आलेला ह्याची साखरे बाबूसोबत चांगली घसट म्हणून ह्याला भेटायला गेलो आणि आईशप्पथ सिनीअर्सबद्दलच माझं मत बदलल, तेंव्हापासून आतापर्यन्त हा माझे प्रॉब्लम्स सॉल्व करतोय.
म्हणजे फर्स्टला तापानं फणफणलो तेंव्हा सायकलवरुन मला कंदोई डॉक्टरकडे हाच घेऊन गेला (त्याने बसायच्या जागी लै जो-यात सुई दिली होती).अनावरच्या प्रकाशनाचा जास्तीत जास्त खर्च ह्यानेच उचलला. अगदी काल परवा उपाशीपोटी एन्डोस्कोपी झाल्यावर जेंव्हा ग्लानी आली तेंव्हा सावरायलासुद्धा हाच होता.
सुरवातीच्या माझ्या पाणचट कविता हा आवडीने वाचायचा कुणी वाचू नये म्हणून मी कपाटातल्या आतल्या कप्प्यात ठेवायचो तरी हा बिनदिक्कत तिथेही लुडबुडायचा ह्यानेच मला डायरी दिली होती पहिल्यांदा.
एका स्थानिक दैनिकात  माझी "कातरवेळ" छापून आली होती तेंव्हा ह्याने मला मेहतामध्ये ट्रीट दिली 25 रूपयात भरपेट थाली होती तेंव्हा. खर सांगतो सिनेमाचा स्क्रीनप्ले ज्यादिवशी लॉक केला तेंव्हा खुशीत येऊन आमच्या प्रोड्यूसरने जबरदस्त पार्टी दिलेली पण वाशीममधल्या मेहताच्या थालीची चव काय नव्हती त्यात.
पण आयुष्यात खुप सोसल ह्याने परिस्थितिशी खुप झुंजला हा माणूस. एव्हढे दुःखाचे कढ पचवून कायम हसतमुख कस राहता येत ह्याला हे एक कोड मला कधी सुटल नाही.
विपरीत परिस्थितीत ताईने जिद्दीने शिकवल, डिप्लोमा पास झाल्या झाल्या
सरकारी नौकरीसुद्धा लागली आणि ती सांभाळून त्याने B.E. कम्पलीट केल तेंव्हाच्या जीवघेण्या कसरतीबद्दल त्याने मला लिहिल एकदा.
" आधार वाटाव अस सोबत कुणीच नव्हतं पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणणारं कुणीतरी असाव लागत रे".
BE झाल्यावर सुखासीन नौकरी सोडून हा बिजनेसमध्ये पडला आणि हात  पोळून घेतल्यावर M. Tech.करून प्राध्यापक झाला. आता जरा बरे दिवस आलेत बेट्याला अगदी कालपरवाच त्याचा साखरपुडाही झाला. भैताडाला बायको चांगली भेटलिये विशेष म्हणजे खुप समंजस आहे. खुप खुश होते दोघेही साखरपुड्यात. खुप दिवसानंतर ह्याला एव्हढ खुश पाहून फार बर वाटल.
आज त्याचा वाढदिवस "हजार बाराशे वर्ष जग दोस्ता."
शुभेच्छा रे.

महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected