लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

गोष्ट मुंबईची : मुंबई डायरी

गोष्ट मुंबईची

धुंदीत चालण आपल्याला आवडतं त्यातल्या त्यात जर डोक्यात एखादी गोष्ट वा ओळ रेंगाळत असली तर रस्ता कसा सरला कळत नाही..,

असाच क्रॉसिंगवरुन जात होतो, "भैय्या" असा आवाज समोरून कानी पडला चमकून पाहिल, विचित्र वेडंवाकड तोंड करत नी अटकत अटकत बोलत  "ती" मला म्हणाली "कानात हेडफोन टाकून चालू नको कधी पटरी  ओलांडतांना डावी उजवीकडं बघून जा बरं.."
हे सांगताना तिला कष्ट पडत होते विकलांग होती ती मला आठवल दोन दिवसां अगोदर एक तरुण कटला होता असाच कानात हेडफोन होता त्याच्या. मी मान हलवली तिच्याकड बघून हसलो ती निघून गेली. बाजूचा एक मिशाळ तुपाळ चेह-याचा माणूस मला म्हणाला " अर्धवट आहे ती, परवा एकजण कटला तिच्यासमोर तेंव्हापासून प्रत्येकाला असच सांगत सुटलिये.
मी म्हटलं बरोबर आहे राव इतरांना जपणारे, दुसऱ्यांच्या जीवाची काळजी करणारे माणसं अर्धवटच तर असतात हल्ली तुपाळ, मिशाळ मामा माझ्याकडं बघत राहिला. मी पळालो ०८:४५ मि. डोंबिवली पकडायची होती..,

-महेंद्र गौतम.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected